Monday, August 22, 2011

थरांचा थरार

दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून जन्मलेला खेळ. त्याचा आता ‘स्पोर्ट’ झालाय ‘स्पोर्ट’. त्यात संस्कृती किती उरलीय हा वादाचा मुद्दा झाला, पण त्याचं स्वरूप फार (जरा जास्तच) मोठं झालंय. बक्षिसांच्या रकमांमधे शून्यावर शून्य चढवली जातायत. (गोविंदांच्या हातातही बहुदा शून्यच येत असावीत.) वर्गणी चं स्वरूप वर्गणी सारखं कमी आणि खंडणी सारखं अधिक वाटायला लागलंय. स्पॉन्सर्स चे बॅनर आणि डीजेंचे स्पीकर दोन्ही वर्षागणिक मोठे होतायत. यातले गोविंदा मात्र मनो-यासरशी वर जातात आणि मनो-यागत खाली येतात.


या प्रकारात त्यांना कुठला आनंद मिळतो ते मला ठाऊक नाही पण ते जीव धोक्यात घालतात एवढं दिसतं. ८ थर.... ९ थर..... १० थर.....; थरांची संख्या वाढत जाते. आयोजक याला ’थरार’ असं म्हणतात. बघणा-यांचा हे बघूनच थरकाप होतो. आणि प्रत्यक्ष गोविंदा मात्र थरा थराला थरथरतात.


एकूणच सगळं कुठल्या थराला नेलंय... काय रे बाबा!

Friday, August 19, 2011

Polythene Bags

Now, if one goes shopping at any mall in India and wants a polythene bag to carry his stuff, he has to pay for the bag. A new initiative to reduce or curb the use of plastic. The price to be paid for the bag varies from city to city, area to area and mall to mall. A few out of many, carry their own bags and don't go for the plastic ones. But many still get the plastic bags. Some feel proud doing that. May be it gives them a feeling of being richer and able to afford these upcoming luxuries.


The additional revenue generated from sale of the plastic bags would definitely be a good amount. Now, if that amount is either forming a part of the Income Statements of the malls/shops, the whole initiative is in vain. It won't serve any purpose. Ideally, the income so generated should form part of a National Reserve speacially created for this purpose. This reserve should be used to build waste disposal plants, or some polythene recycling units or something like that. But something like that to happen, doesn't sound cool in here. 




So now, there is one more item to be billed; and the bags are still there to be filled.

Monday, August 15, 2011

रिक्शा...


आता रिक्शा मिळणं हे लॉटरी लागण्याइतकं ’रेअर’ झालेलं आहे. मुंबई, पुणे, आणि माझ्या माहिती प्रमाणे जवळपास सगळीकडेच ही गत आहे.


  • रिक्शा रिकामी नाही असं आता फ़ारसं होत नाही. किंबहुना तो मुख्य प्रॉब्लेम नव्हे. कारण रिक्शा जास्त करून रिकाम्याच बघायला मिळतात.
  • पूर्वी रिक्शावाला विचारायचा, ’कहां जाओगे?’; आता प्रवासी विचारतात, ’कहां जाओगे?’
  • एखादा रिक्शावाला थांबलाच, आणि प्रवाशाने एखादं जवळचं ठिकाण सांगितलं की त्या प्रवाशाकडे अतिशय तुच्छतापूर्ण नजरेने बघून रिक्शावाला निघून जातो.
  • म्हाता-या माणसांनाही हे मुजोर रिक्शावाले तितक्याच उद्धट्पणे नाकारतात. विसरत असावेत की एक दिवस तेही म्हातारे होतील, त्यांनाही कदाचित चालणं कठीण होईल आणि मग तेंव्हा त्यानाही रिक्शा किंवा कुठल्यातरी वाहनाची गरज लागेल.. जाउदे; ज्याचे त्याला. 
  • काही रिक्शास्टॅंड वर रिक्शावाले भाजीवाल्यांप्रमाणे ओरडत असतात. ’चला वाघबील वाघबील वाघबील....’; ’चला काशीमिरा काशीमिरा, काशीमिरा...’ असं.
  • पोलिस वगैरे यांना काही करत नाहीत. तक्रारींचे फ़ोन काढून ठेवलेले असतात आणि पर्सनली गेलं तर कुणाला फ़ारसा वेळ नसतो. त्यामुळे रिक्शावाल्याना कधी ’पोलिसांकडे जाईन’ सांगून धमकी देण्याचा प्रयत्न केला, किंवा नंबर वगैरे नोंद करून घेतला तरी त्याना फ़िकीर नसते कारण, शिक्षा होण्याची भिती नसते. अर्थात, कदाचित काही ठिकाणी पोलिस दखल घेऊन शासन करतही असतील, नाही असं नाही. पण बहुतांश ठिकाणी ते काही करत नाहीत. काही राजकीय पक्षांनी याबाबत पावलं उचलली आहेत आणि तेच पक्ष कदाचित यांना दम देऊन सरळ करू शकतील असं कुठेतरी वाटतं. पण ही गोष्टही रिक्शा मिळण्याइतकीच ’रेअर’.


तर असा प्रॉब्लेम आहे ना? प्रवाशांना ज्या त्या ठिकाणी जायचंय. रिक्शावाल्यांना त्यांना हव्या त्याच ठिकाणी जायचंय. माझ्या मते यावर साधा सरळ उपाय होऊ शकतो. बस वर कशा पाट्या असतात गंतव्य स्थानाच्या, तशा रिक्षांवर लावाव्यात. म्हणजे प्रश्नच मिटला.

(वरील फ़ोटो एडिट केलेला आहे)

Saturday, August 13, 2011

माजणारे माजतात

एक अरुंद गल्ली. त्यात दोन गाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या. दोघांनीही एकमेकांना दिव्यांचे इशारे केलेले होते. त्यापैकी एक गाडी दुस-या गाडीच्या इशा-याला मान देऊन एका अशा स्पॉटला थांबली की जिथे दुस-या गाडीला एका बाजूला थांबायला जागा मिळेल.

दुसरी गाडी पुढे येत, बाजूला न जाता, पहिल्या गाडीच्या समोर फ़ूटभर अंतर ठेवून थांबली. पहिल्या गाडीच्या चालकाने गाडी थोडी मागे घेतली. दुसरी गाडी तितकीच पुढे आली. पहिल्या गाडीच्या चालकाने २ वेळा हाताने खूण करून समोरच्या गाडीस बाजूला जायला सांगितले. तरीही ती गाडी ढिम्म. एकदा हा लाईट देई एकदा तो. शेवटी पहिल्या गाडीचा चालक गाडीच्या बाहेर उतरला. धो धो पाऊस आणि रात्री आठ ची वेळ. (सोयीसाठी चालक १, चालक २, गाडी १, गाडी २ अशा संज्ञा यापुढे वापरू)

(चालक १ समोरच्या गाडीपाशी जाऊन खिडकी उघडायला हाताने खूण करतो. त्यानुसार गाडी २ ची खिडकी खाली होते.)
चालक १: काय प्रॉब्लेम आहे?
चालक २: तुम्हे क्या प्रॉब्लेम है?
चालक १: मैने लाईट दिया आप साईड नही ले सकते?
चालक २: मैने पहले लाईट दिया है; शुरू से.
चालक १: लाईट मैने भी दिया था. और आपका लाईट देख के मैं यहां रुका हूं तो आप आगे आए चले जा रहे हो?
चालक २: तो तू पीछे ले ना.
चालक १: लेकिन आपको यहां सामने साईड मे लेने के लिये जगह थी; आप ले सकते थे साईड.
चालक २: मेरा गाडी दिख नही रहा कितना बडा है, कैसे जाएगा? आपका गाडी छोटा है..
चालक १: (मधेच तोडून) छोटा बडा गाडी बात नही करने का. किसका गाडी को छोटा बोलता है?
चालक २: हां तू पीछे ले (काच बंद करतो)
चालक १: (चिडून) काच नीचे कर. (२ वेळा) (काच खाली घेतली जाते)
चालक १: मैने एक तो कर्टसी दिखाया, यहां पे रुका हूं लाईट देखके; आगे तू आया बिना वजह.
चालक २: हां तो थोडा कर्टसी और दिखा कल दो रुपया दे दूंगा.
चालक १: (प्रचंड भडकून) क्या मतलब? पैसे का बात किससे करता है रे तू? क्या मतलब २ रुपया दे दूंगा समझता कौन है रे?
चालक २: इतना कर्टसी दिखाया तो थोडा उपकार और करदो बोला कल पैसा दे दूंगा.
चालक १: (२ सेकंद पॉज घेऊन; त्या व्यक्तीकडे, त्याच्या गप्प बसून त्याला साथ देणा-या बायको कडे बघून) ईंडिया का जो आज हालत हुआ है ना; वो आप जैसे लोगोंकी वजह से हुआ है.
चालक २: हां तो आप रह ही रहे हो ना फ़िर भी इंडिया में

चालक १ गाडीकडे तरातरा चालत गेला, चाकांचा चीत्कारसदृश आवाज करत गाडी सुरू करून बाजूच्या जागेतून मार्ग काढत पुढे निघून गेला.


थोडक्यात, चालक १ हा भारतातील मोजक्या सूज्ञ लोकांपैकी एक होता. समंजस पणे वागत होता. पण चालक २ तितकाच माजलेला, निर्लज्ज आणि फ़ुलीफ़ुली होता. अशा लोकांची पिलावळ आज भारतात फ़ार वाढलीय आणि त्यांचीच मेजॉरिटी झालीय. त्यामुळे चालक १ म्हणाल्याप्रमाणे जोपर्यंत ही अशी लोकं आहेत तोपर्यंत देशाची प्रगती होणं केवळ अशक्य. यांना सुधारणं त्याहून अशक्य.

फ़रहात शेहज़ाद यांच्या गज़ल मधला एक शेर फ़ार योग्य वाटतो मला.

जिसकी फ़ितरत ही डसना है
वो तो डसेगा; मत सोचा कर

...तर, त्यांना सुधारणं अशक्य आणि त्यांची पिलावळ वाढतंच राहणार; त्यामुळे भारताचं काही खरं नाही हेच खरं.